तालिबानवरुन मोदी सरकारला ओवेसी यांचे आव्हान

Update: 2021-09-02 15:54 GMT

अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता ताब्यात घेतल्यापासून भारताची तालिबान बाबत भूमिका काय असेल यावर तर्कवितर्क लढवले जाते आहेत. पण मोदी सरकार तालिबानबाबत दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोपी MIMचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. ओवेसी यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारला तालिबानबाबत काही थेट सवाल केले आहे. तालिबान जर दहशतवादी संघटना असेल तर मोदी सरकार तालिबान आणि हक्कानी नेटवर्कला दहशवादी संघटनांच्या यादीत का टाकत नाही आणि जर मोदी सरकारला तालिबान दहशतवादी संघटना वाटत नसेल तर भारतातील गरीब मुस्लिमांना तालिबानी संबोधणे बंद करावे, अशी टीका ओवेसी यांनी केली आहे.

ओवेसी यांनी मोदी सरकारवर शायराना टीकाही केली आहे, "सरकार क्यों शर्मा रही है? पास आते भी नहीं, चिलमन से हटते भी नहीं, पर्दे से झांक-झांककर मोहब्बत क्यों? खुलकर बोलिए न..

अशी टीका ओवेसी यांनी केली आहे. हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, त्यामुळे आम्ही जे सवाल विचारले आहेत त्याचे उत्तर सरकारला द्यावेच लागेल, असेही ओवेसी यांनी म्हटले आहे.

Similar News