आता आकांडतांडव, आक्रोश कशाला ? सचिन सावंत

भाजपाच्या काही नेत्यांची सुरक्षा कमी केल्याच्या कारणावरुन विरोधक सत्ताधारी आरोपप्रत्यारोप सुरु असताना कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी गांधी परीवार आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या सुरक्षा कमी केल्यावर आनंदाच्या उकळ्या फुटणाऱ्या भाजनं आता आकांडतांडव, आक्रोश कशाला करावा असा प्रश्न उपस्थित केला आहे.

Update: 2021-01-10 13:40 GMT

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत मोठी कपात करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतल्यानंतर फडणवीस यांच्या ताफ्यात असलेली बुलेटप्रुफ गाडीसुद्धा काढून घेतली. फडणवीसांबरोबरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेतही सरकारकडून कपात करण्यात आली आहे.

सुरक्षेच्या कमी केल्यानंतर 'राज्यसरकारचा निर्णय दुर्दैवी,सुडाचं राजकारण करणारा आणि खोट्या मनोवृत्तीचा निर्णय आहे' असा आरोप भाजपकडून करण्यात आला.

या आरोपाला उत्तर देताना कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले, भाजपा नेत्यांना धोका नसल्याने सुरक्षा कमी झाली तर आकांडतांडव, आक्रोश, आकांत, विलाप , बोंब इ. भावना उचंबळू लागल्या. परंतु गांधी परिवाराला धोका असतानाही त्यांची व डॉ मनमोहन सिंहांची सुरक्षा, स्टाफ कमी करताना आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. मोदीजींची सूड भावना असते, मविआ सरकारची नाही असे सांगितले.

Full View


Tags:    

Similar News