Public Frustration with Traffic : प्रगती की कायमची शिक्षा?

एका पुलाचं काम संपल्यावर दुसऱ्याचं नियोजन कसं असावं, याचा विचार करणारे आपले 'साहेब' आणि 'नोकरशहा' नेमके AC केबिनमध्ये बसून काय करतात? आपल्या कष्टाचा पैसा जातोय कुठे? आपण वेळेवर TAX भरतो, Toll देतो. कशासाठी? तर नरकयातना सोसण्यासाठी? साध्या रस्त्यांची आणि नीट नियोजनाची अपेक्षा करणं हा गुन्हा झाला आहे का? वाचा ज्येष्ठ पत्रकार निलेश खरे यांचा अनुभव

Update: 2026-02-24 09:17 GMT

Progress or eternal punishment?  प्रगती की कायमची शिक्षा? 'ट्रॅफिक'च्या नावाखाली सामान्य माणसाचे आयुष्याचा चक्काजाम! traffic jams and dust

ही बातमी news नाही माझा अनुभव experience आहे .

गेल्या ४-५ वर्षांपासून Vashi to Mumbai वाशी ते मुंबई प्रवास म्हणजे ट्रफिक जाम, लांबच लांब रांगामध्ये उभं राहणं. नवीन पुलाचं काम सुरू होतं, म्हणून आपण 'उद्याच्या सुखासाठी' आजचा त्रास निमूटपणे सहन केला. काही महिन्यांपूर्वी कुठेतरी तो पूल पूर्ण झाला आणि वाटलं की आता श्वास घेता येईल. पण कसचं काय! एका पुलाचं काम संपत नाही तोच मानखुर्दजवळ दुसऱ्या कामाचा 'राडा' सुरू झाला. प्रगती नक्की कोणाची होतेय? सध्याची परिस्थिती बघितली तर असं वाटतंय की, या रस्ते आणि पुलांच्या बांधकामातच आपल्या अख्ख्या पिढीचं आयुष्य खर्ची पडणार आहे. काय मिळालं आपल्याला या बदल्यात?

कोंडीत अडकलेलं आयुष्य, सकाळी कामावर जाताना ट्रॅफिक आणि येतानाही ट्रॅफिक. उरलेलं आयुष्य फक्त गाडीच्या सायलेन्सरचा धूर घेण्यात आणि खड्ड्यांतून कंबर मोडून घेण्यात जातंय. नियोजन शून्यता, एका पुलाचं काम संपल्यावर दुसऱ्याचं planning नियोजन कसं असावं, याचा विचार करणारे आपले 'साहेब' आणि 'नोकरशहा' नेमके एसी केबिनमध्ये बसून काय करतात? रस्त्यावरच्या धुळीचा आणि खड्ड्यांचा त्रास त्यांना का समजत नाही? आपल्या कष्टाचा पैसा जातोय कुठे? आपण वेळेवर टॅक्स भरतो, टोल देतो. कशासाठी? तर नरकयातना सोसण्यासाठी? साध्या रस्त्यांची आणि नीट नियोजनाची अपेक्षा करणं हा गुन्हा झाला आहे का?

आता सहनशक्ती संपली आहे! लोकांमध्ये अजून किती सहनशीलता आहे, याची परीक्षा घेणं आता थांबवावं. रस्ते बांधताना लोकांच्या वेळेची आणि आरोग्याची जी राखरांगोळी होत आहे, त्याला जबाबदार कोण? फक्त सिमेंट आणि काँक्रीटची जंगलं उभी करणं म्हणजे विकास नाही. सामान्य माणसाचा प्रवास सुखाचा होणं हा त्याचा हक्क आहे, उपकार नाहीत. जर आपल्या आयुष्याची २५-३० वर्ष फक्त traffic jams and dust ट्रॅफिक जॅम आणि धुळीतच जाणार असतील, तर अशा 'विनाशाच्या' नियोजनाला विकास म्हणायचं का? असा प्रश्न विचारण्याची आता वेळ आली आहे. विकासाला विरोध नाही .. मात्र त्या विकासाच्या पध्दतीला आणि नियोजन शुन्यतेला आहे .

Similar News