राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातील संघर्ष जगजाहीर आहे. राणेंच्या अटक नाट्याच्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एक शब्दचही बोलले नव्हते. पण चिपी विमानतळाच्या उद्घाटनपर कार्यक्रमात राणे आणि ठाकरे एकाच मंचावर आले. नारायण राणे यांनी जाहीरपणे मुख्यमंत्र्यांकडे कोकणातील लोकप्रतिनिधींची तक्रार केली. तसेच शिवसेनेवरही टीका केली. राणेंच्या या टीकेला आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी सडेतोड उत्तर देत हिशेब तिथेच चुकता केला. या नेत्यांमधील हा कलगीतुरा