मस्ती आल्यासारखे वागणाऱ्या दानवेंचा सत्यानाश होईल; 'जावई'बापुची जहरी टीका

Update: 2020-12-11 15:51 GMT

औरंगाबाद : दिल्ली-हरियाणा सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांबद्दल केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात औरंगाबादमध्ये प्रहार संघटनेकडून कालपासून पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू आहे.आज या आंदोलकांची माजी आमदार तथा रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी भेट घेतली.यावेळी त्यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर निशाणा साधला.

दानवे यांचे वक्तव्य तोल नसलेल्या माणसाप्रमाणे आहे. तर दानवे सुधारण्याऐवजी बिघडत चालले असून, त्याच कारण म्हणजे त्यांना प्रचंड अहंकार झाला आहे.त्यांना झालेला अहंकार कंसाला सुद्धा लाजवेल असं आहे.त्यामुळे जसा कंसाचा अंत झाला तसाच अंत दानवे यांचा होईल, किंबहुना त्यापेक्षा वाईट पद्धतीने होईल अशी जहरी टीका जाधव यांनी यावेळी केली.

तर दानवे यांचे वक्तव्य जगजाहीर आहे. त्यांनी गेल्या वेळी शेतकऱ्यांना साले म्हटलं होतं, आता शेतकऱ्यांना आंदोलनाला पाकिस्तान-चीनचा पाठिंबा असल्याचं म्हणतात. यातून दानवेंची मग्रुरी दिसते. तसेच दानवे यांना वाटतं मी काहीही केलं आणि मोदींच्या कुशीत जाऊन बसलो तर माझं काहीच होणार नाही.त्यामुळे दानवे हे मस्ती आल्यासारखं वागत असेल तर त्यांचा अंत होईल. आतापर्यंत ज्या-ज्या लोकांनी अहंकार केला आहे त्यांचा सत्यानाश झाला आहे. त्याचप्रमाणे दानवे यांचा सुद्धा सत्यानाश होईल ही काळ्या दगडावरची पांढरी रेष असल्याचं सुद्धा जाधव म्हणाले.

Tags:    

Similar News