आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आश्रम सुरू करणार :राजू शेट्टी

शेतकऱ्यांच्या पुढील पिढीची हेळसांड रोखण्यासाठीआत्महत्याग्रस्त (farmers)शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आश्रम सुरू करणार असल्याची घोषणा माजी खासदार आणिस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे.

Update: 2023-06-05 08:12 GMT

शेतीच्या(agriculture) अडचणी दिवसेंदिवस वाढत असताना   शेतकऱ्यांच्या पुढील पिढीची हेळसांड रोखण्यासाठीआत्महत्याग्रस्त (farmers )शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आश्रम सुरू करणार असल्याची घोषणा माजी खासदार आणिस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे.

कोल्हापुरात नुकतेच नांगरट साहित्य संमेलन पार पडले त्यावेळी त्यासंबंधीची घोषणा शेट्टी यांच्याकडून करण्यात आली.कोल्हापूरातल्या जयसिंगपूर येथे आश्रम सुरू करणार असून किमान पदवीपर्यंत शिक्षण देता यावे यासाठी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना दत्तक घेणार आहे. पुढच्या नांगरट साहित्य संमेलनापर्यंत आश्रम सुरू करणार असे माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेवटी सांगितले.

Full View

Tags:    

Similar News