सीना नदीच्या पुरानं होत्याचं नव्हतं केलं..!

Update: 2022-10-17 12:12 GMT

दिवाळी सण तोंडावर असताना शेतकरी मात्र अस्मानी- सुलतानी संकटाला झुंजत आहे. उन्हाळी खरीपा पाठोपाठ रब्बीच्या उरल्यासुरल्या आशा अतिपावसाने संपल्या आहे. राज्यभर सुरु असलेल्या पावसानं गेल्या चार पाच दिवसात सोलापूर जिल्ह्या झाडपून काढला आहे.


 



या पावसानं काढणीला आलेल्या शेती पिकांचं व्हत्याचं नव्हतं केलं आहे. करमाळा,माढा तालुक्यात झालेल्या ढगफुटीनं सिना नदीला पूर आल्याने अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे नदी काठच्या जनजीवनावर असह्य झालं आहे. पुराच्या पाण्यात शेती पिकांचे नुकसान झाले असून पाऊस मात्र थांबायचं नाव घेत नाही.




 


पिकांचे नुकसान झाल्यानं शेतकरी संतापला असून तातडीनं पिकांचे पंचनामे करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी आहे, प्रतिनिधी अशोक कांबळेंचा ग्राऊंड रिपोर्ट....



Full View

Tags:    

Similar News