Dr. B.R. Ambedkar : शेती हाच ग्रामीण आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा !
शेतीला उद्योगाचा दर्जा द्यावा आणि तो सरकारी उद्योगाचा असेल तर अधिकच चांगले होईल. या बरोबरच, शेतीचे एकत्रीकरण आणि तुकडेजोड करून आकारमान वाढवावे, शेतीतील आतिरिक्त मनुष्यबळ बिगर शेती रोजगारात गुंतविणे, शेती आदानांचा वापर वाढवावा. म्हणूनच औद्योगिक विकास हाच शेती विकासाचा प्रभावी उपाय आहे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर Dr. B.R. Ambedkar हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थशास्त्रज्ञ Economist होते. कारण त्यांचे सर्वाधिक शिक्षण अर्थशास्त्रातील होते. विशेष म्हणजे ते शिक्षण परदेशात म्हणजेच अमेरिका आणि इंग्लंडमध्ये झाले होते. त्यांचा एम. ए. ,पीएच. डी. आणि डी. एस सी. साठीच्या संशोधणासाठी ही अर्थशास्त्र हाच विषय होता. विशेष म्हणजे त्यांचे हे अर्थशास्त्रातील संशोधन अमेरिकेतील कोलंबिया आणि इंग्लंड मधील इंग्लंड विद्यापिठात झाले होते.
एवढेच नव्हे तर, ते विकास धोरणकर्ते कारण ते 1942 ते 46 या कालावधीत बाबासाहेब काऊन्सिल मंत्रीमंडळात कॅबिनेट दर्जाचे श्रम, ऊर्जा आणि जल मंत्री होते. कारण या खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी स्वातंत्र्यपूर्वकालीन विकास धोरण निश्चितीत आणि अमंलबजावणीत महत्वाचे योगदान दिले आहे.
बाबासाहेबांचे देशाबद्दलचे प्रेम आणि राष्ट्रभक्ती यामुळे त्यांनी देशासमोरील आर्थिक आणि सामाजिक समस्याच त्यांचा संशोधनाचा विषय होता. असेच एक त्यांचे अत्यंत महत्वाचे संशोधण म्हणजे भारतीय शेतीच्या समस्या होय. भारताची तोंड ओळख म्हणजे भारत हा शेती प्रधान देश होय. ती जशी स्वातंत्र्यपूर्व काळात तशीच ती आज ही म्हणजेच स्वातंत्रोत्तर काळात ही. मात्र दुर्दैवाने आज ही आपण भारतीय शेती च विकास करण्यात आपण यशस्वी झालो नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे (doctor Babasaheb Ambedakar )शेती समस्या विषयक विचार आणि उपाय आपणास त्यांच्या 1918 मध्ये प्रसिद्ध झालेल्या "Small Holdings in India and Their Remedies" या जर्नल ऑफ इंडियन इकनॉमिक सोसायटी या अत्यंत नामांकित आणि प्रसिद्ध अशा जर्नलमध्ये, आणि त्यांच्या 1947 मध्ये प्रसिद्ध झालेल्या "States and Minorities" या प्रसिद्ध अशा ग्रंथात. ते सर्व प्रथम भारतीय शेतीचे महत्व, शेती पुढील समस्या आणि नंतर ठोस अशा उपाय योजना सुचवितात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते, शेती ही भारतासारख्या देशासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण शेतीच लोकांची महत्वाची अन्न ही गरज भागवू शकते. उद्योगांचा विकास कच्च्या मालाशिवाय होऊ शकत नाही आणि शेती आवश्यक कच्चा माल पुरविण्यात अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडते. तसेच प्राथमिक उद्योग विकासात शेतीचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे. मात्र दुर्दैवाने भारतीय शेती पुढे अत्यंत महत्वाच्या समस्या असून त्याची व्याप्ती आणि तीव्रता अधिक आहे. भारतीय शेतीचे आकारमान अत्यंत लहान असून ते विखुरलेले आहेत.
आसाममध्ये शेतीचे सरासरी आकारमान 3.37 एकर अत्यल्प असताना ते 3.3 एकर पर्यंत कमी झाले आहे. तर ते मद्रासमध्ये सरासरीने फक्त 7 एकरच राहिले आहे. त्यानंतर बाबासाहेबांनी पुण्य जवळील पिंपळा सौदागर या खेड्यात ही शेतीचे आकारमान किती अल्प आहे ते स्पस्ट केले आहे. त्यांच्या मते, 1 ते 2 एकर आकारमान असलेले 164 शेतकरी, तर 20 ते 30 गुंठे आकारमान असलेले 136 शेतकरी होते. या वरुण खेड्यात ही शेतीचे आकारमान किती लहान आहे ते स्पस्ट केले आहे. त्यानंतर बाबासाहेब शेतीवर कसे अतिरिक्त अवलंबित्व आहे ते स्पष्ट करतात.
शेतीवर उदरनिर्वाहाचे साधन म्हणून अवलंबून असणार्या लोकांचे प्रमाण 71.5% एवढे अतिरिक्त असून ते परदेशात इंग्लंड 15.3%, अमेरिका 33.3% आणि आयर्लंड 44.7% एवढे अत्यल्प आहे. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय शेतीची उत्पादकता अत्यल्प असल्याचे सिद्ध करतात. कॅनडामध्ये दर एकरी उत्पादकता 1723 किलो गहू आणि 3191 किलो मका आहे, तर ती भारतातील 555 आणि 766 अनुक्रमे एवढीच आहे. या बरोबरच डॉ. आंबेडकर हे सांगतात की, शेतीचे योग्य आर्थिक आकारमानाचे विचार फक्त मागणी किंवा प्राप्ती दृष्टीकोनातून न करता पुरवठयाच्या बाजूने करायला पाहिजे, ज्यात उत्पादन घटकांच्या प्रमाणाचा आणि वापराचा विचार करणे गरजेचे आहे.
दुर्दैवाने भारतात शेती अवजारे आणि प्राणी उपलब्धता आणि वापर ही कमी झाला आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काही अत्यंत महत्वाचे उपाय सुचविले आहेत. मात्र त्यात त्यांनी सर्वात अधिक महत्व औद्योगिक विकासाला दिले आहे. त्यांच्या मते, ओद्योगिक विकास हाच प्रभावी आणि सिद्ध उपाय आहे, जो अमेरिकेत सिद्ध ही झाला आहे आणि भारतात राबविणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी भारताने औद्योगिकरणास प्राधान्य देऊन प्रामाणिक प्रयत्न करावा त्यातून शेतीचा विकास होवून देशाचा ही विकास होईल. म्हणून भारताच्या शेती विकासाठी औद्योगिक विकास अत्यावश्यक आहे. तोच अत्यंत खात्रीचा, सिद्ध आणि विश्वसनीय उपाय आहे. त्याबरोबरच शेतीला उद्योगाचा दर्जा द्यावा आणि तो सरकारी उद्योगाचा असेल तर अधिकच चांगले होईल. या बरोबरच, शेतीचे एकत्रीकरण आणि तुकडेजोड करून आकारमान वाढवावे, शेतीतील आतिरिक्त मनुष्यबळ बिगर शेती रोजगारात गुंतविणे, शेती आदानांचा वापर वाढवावा. म्हणूनच औद्योगिक विकास हाच शेती विकासाचा प्रभावी उपाय आहे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगतात.
आज ही भारत शेती प्रधानच देश आहे. शेती हाच ग्रामीण आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आज ही भारतीय शेती 60% पेक्षा अधिक लोकसंख्येचे उदरनिर्वाहाचे साधन आहे. म्हणजेच बिगर शेती रोजगार निर्माण करण्यात आपण यशस्वी झालो नाही कारण उद्योग विकासाचा केंद्र बिंदू आपण शहरी भागच ठेवला, त्यात थोडाबदल झाला आहे मात्र तो अपेक्षित नाही. त्यातच शेतीतील रोजगार हंगामी असून त्यातील स्त्रियांचा सहभाग अधिक आहे. मात्र दुर्दैवाने स्त्री आणि पुरुष यांच्या वेतन दरात खूपच फरक आहे.
आपल्या देशात खाजगी मालकी आहे. शेतीला उद्योगाचा दर्जा दिलेला नाही. दर्जा दिलेला नाही आणि सरकारी मालकीच्या उद्योगाचा दर्जा तर अजिबातच दिलेला नाही. आज ही ते ग्रामीण अर्थव्यवस्थेचे उदरनिर्वाहाचे साधन आहे. भारतीय शेतीपुढे आज ही अल्प जमीन धारणा आणि विखुरलेलेच आहे. किंबहुना शेतीचे आकारमान खूपच लहान लहान होत आहे आणि ते मोठ्या प्रमाणावर विखुरले जात आहे. विशेष म्हणजे शेतीचे योगदान देशाच्या विकासात सातत्याने घटतच आहे. नियोजनाच्या सुरवातीच्या काळात भारतीय शेती आपल्या देशाच्या स्थूल देशांर्गत उत्पादनात 50% पेक्षा अधिक होता तो आज 20% पेक्षा ही कमी आहे. मात्र त्या वेळेलाच शेतीवरील आपले उदरनिर्वाहाचे साधन म्हणून आपले अवलंबित्व फारसे कमी झाले नाही.
देशातल्या शेतीत सार्वजनिक गुंतवणूक सातत्याने कमी कमी होत आहे आणि खाजगी गुंतवणूक अत्यंत अल्प असून होणारी भांडवल निर्मिती ही अल्पच आहे. विशेष म्हणजे आज ही भारतीय शेती मान्सूनवरील जुगारच आहे. म्हणजेच आपण शेतीसाठी आवश्यक जल सिंचन सुविधा निर्माण करण्यात यशस्वी झालो नाही. आज ही भारतीय शेतीची उत्पादक्ता तुलनेने कमीच आहे, जरी देशात हरितक्रांती झालेली असली तरी.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शेती विषयक उपाय आणि धोरणेच भारतीय शेतीचा विकास करण्यास उपयुक्त ठरू शकतील. सर्व प्रथम आपण बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे शेतीला उद्योगाचा दर्जा देणे अत्यावशक आहे. जर शेतीस सरकारी मालकीच्या उद्योगाचा दर्जा दिला तर ते अधिकच उत्तम होईल कमीत कमी सामुदायिक आणि सहकारी शेतीचा अवलं करणे आज अत्यावश्यक आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शेतीचा स्वतंत्र असा विकास होणे शक्य नसते, त्यासाठी उद्योगांचा विकास अग्रक्रमाने करणे अत्यावश्यक असून त्याच वेळेला शेतीतील अतरिक्त लोकसंख्या बाहेर काढून औद्योगिक रोजगारात समाविष्ट करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण औद्योगिक विकास हे अमेरिकेत सिद्ध झालेले विकासाचे धोरण असल्याने शेतीच्या आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी ते आज अत्यंत गरजेचे आहे.
आज ही शेतीचे आकारमान अत्यंत कमी कमी होत असून जमिनीचा बिगर शेती वापर खूपच वाढत आहे ते शेती विकासास अडथळा ठरू शकेल. बाबासाहेबांनी शेतीच्या आकारमानाकडे बघताना पुरवठा बाजूने पाहणे आवश्यक, म्हणजे आदांनांच्या वापराकडे लक्ष देणे आवश्यक आहे म्हणजेच सिंचन सुविधा, अवजारे आणि इतर ही. वर नमूद केल्याप्रमाणे देशाचे शेती, औद्योगिक आणि आर्थिक विकास धोरण तयार करून प्रामाणिकपणे राबविल्यास भारतीय शेतीचा आणि अर्थव्यवस्थेचा सर्वांगीण विकास निश्चितच होईल असे वाटते.
प्रा. डॉ. पी. एस. कांबळे
अर्थशास्त्र विभाग
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.