देशातील 10 प्रमुख कामगार संघटनांनी आज गुरुवार, 12 फेब्रुवारी रोजी भारत बंदची हाक दिली आहे. केंद्र सरकारच्या नव्या कामगार कायद्यांविरोधात शेतकरी विरोधी अमेरिका भारत ट्रेड डील विरोधात हा संप पुकारण्यात आला असून सुमारे 30 कोटींपेक्षा अधिक कामगार सहभागी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. शेतकरी संघटनांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिल्याने देशभरात मोठा परिणाम जाणवू शकतो. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडण्यापूर्वी परिस्थितीची माहिती घेणे आवश्यक ठरणार आहे. काय आहे नेमक्या मागण्या? मोदी सरकार नेमकं कुठं चुकतेय? यासंदर्भात शेतकरी नेते डॉ. अजित नवले, ज्येष्ठ कामगार नेते प्रकाश रेड्डी आणि कामगार नेते यशवंत भोसले यांच्यासोबत चर्चा केली आहे मॅक्स किसानचे संपादक संतोष सोनावणे यांनी पाहा