छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य तुम्हाला आणि मला पुन्हा उभे करायचे आहे, असा निर्धार संभाजीराजे यांनी रायगडावर व्यक्त केला आहे. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रायगडावर मोठ्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी केलेल्या भाषणात संभाजीराजे यांनी आपली पुढील दिशा स्पष्ट केली. तसेच राज्यसरकारने शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने शिवप्रेमींना काय सुविधा दिल्या, असा सवालही विचारला. किल्ले रायगडावर हजारो शिवप्रेमींच्या उपस्थित 348 वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा झाला. “आपला सन्मान राखला जाईल तिथेच थांबायचं,आता वाकायचं नाही, आता वाकवायचं, आपल्याला स्वाभिमान जपायचं आहे, जिथे अपमान आहे तिथे थांबायचं नाही” असे यावेळी त्यांनी सांगितले.