राज्यसभा निवडणूक : महाविकास आघाडीची ८ मतं फुटली?

Update: 2022-06-11 05:56 GMT

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचा अनपेक्षित पराभव झाल्यानंतर आता महाविकास आघाडीची कोणती मतं फुटली यावर चर्चा सुरू झाली आहे. प्रफुल्ल पटेल यांना एक मत जास्त पडल्याची माहिती शरद पवार यांनी दिली आहे, ते मत विरोधी पक्षातील एक सदस्याचे असल्याचे शरद पवार यांनी सांगितले आहे. तसेच शिवसेनेचा पराभव झाला असला तरी महाविकास आघाडीची मतं फुटलेली नाहीत, देवेंद्र फडणवीस यांना अपक्षांना आपल्याकडे वळवण्यात यश आले, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांना ४३ मतं पडली आहे. काँग्रेसच्या इम्रान प्रतापगढी यांना 44, भाजपच्या पियुष गोयल यांना 48, अनिल बोंडे यांना 48, शिवसेनेच्या संजय राऊत यांना ४२ मतं पडली आहे. तर भाजपच्या धनंजय महाडीक यांना शिवसेनेच्या संजय पवार यांच्यपेक्षा दुसऱ्या पसंतीची मतं जास्त पडल्याने त्यांचा विजय झाला आहे.

या निवडणुकेच मतदान झाल्यानंतर महाविकास आघाडीची ३ मतं बाद करण्याची मागणी भाजपने थेट केंद्रीय निवडणूक आयोगाला केली. त्यामुळे या वादात रात्री साडे बारानंतर मतमोजणी झाली. जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांच्या मतांवर आक्षेप घेण्यात आला होता. यामध्ये फक्त सुहास कांदे यांचे मत बाद ठरवले गेले. तर काँग्रेसने सुधीर मुनगंटीवर यांच्या मताला आक्षेप घेतला होता.

८ मतं फुटली?

शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांच्या पराभवाबबात ज्येष्ठ पत्रकार रविकिरण देशमुख यांनी ट्विट केले आहे. “महाविकास आघाडीला १६२ मतं पडली आहेत. तर भाजपकडे १२२ मतं होती. शिवसेनेला आपले मित्रपक्ष आणि अपक्षांना सोबत घेण्यात अपयश आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खबरदारी घ्यावी लागणार आहे,” असे त्यांनी म्हटले आहे. “ जर महाविकास आघाडीला १७० मतं आपल्यासोबत असल्याचा विश्वास होता आणि त्यांना १६२ मतं पडली आहेत. तर मग उर्वरित ८ मतं कुठे गेली याचा शोध घ्यावा, कारण येत्या विधान परिषद निवडणुकीत यामुळे राज्य सरकार अडणीत येऊ शकते,” असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

Full View

Similar News