"सर्वोच्च न्यायालयात बऱ्याचदा असं वाटतं की निकाल जनतेच्या बाजून लागेल, सरकारवर ताशेरे मारले जातात आणि नंतर निकाल सरकारला पाहिजे तसाच लागतो" असे वक्तव्य करत राजू शेट्टी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला आहे. ते दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलत होते. किमान 5 आठवडे सरकारला प्रभागरचना करता येणार नाही, असे सांगत राजू शेट्टी यांनी ओबीसी आरक्षणाबाबत राज्यकर्ते हलगर्जीपणा करत असल्याचे म्हटले आहे.