शिवसेनेतील बंडानंतर संकटात सापडलेल्या उद्धव ठाकरे यांनी साद घातली तर राज ठाकरे त्यांना साथ देणार का, असा सवाल राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर शर्मिला ठाकरे यांनी सूचक उत्तर दिल्याने नव्याने चर्चा सुरू झाली आहे. त्या पुण्यात पत्रकारांशी बोलत होत्या. पण यावेळी त्यांनी कोरोना काळात घरात थांबणाऱ्या उद्धव ठाकरे यांना देखील टोला लगावला. त्याचबरोबर मनसेला संपलेला पक्ष म्हणणाऱ्या आदित्य ठाकरे यांना देखील त्यांनी सुनावले आहे.