लोकसभेत ऊर्जा संरक्षण सुधारणा विधेयकावर चर्चा करताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारच्या धोरणांचा समाचार घेतला. सरकार शेतकऱ्यांना ६ हजार रुपये देते पण राज्यांनी मोफत वीज देण्याची घोषणा केली तर त्याला विरोध का करते, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला.