एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात शिवसेनेचे (Shivsena) ३८ आमदार असताना आता शिवसेनेला आणखी धक्का बसला आहे. शिवसेनेतून शिंदे गटात जाणाऱ्या आमदारांची (MLA) संख्या वाढली आहे. एवढेच नाही तर शिंदे गटात आतापर्यंत एकनाथ शिंदेंसह ७ मंत्री (minister) होते, पण त्यामध्ये आणखी एका मंत्र्यांची भर पडली आहे, असे वृत्त सर्वत्र पसरले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Tahckrey) यांनी शनिवारी घेतलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित असलेले आणि गेल्या चार दिवसात शिवसेनेसोबत असल्याचा दावा करणारे एक मंत्री आता गुवाहाटीला गेल्याचे वृत्त आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) हे देखील रविवारी गुवाहाटीला रवाना झाले आहेत. उद्धव ठाकरे यांना हा आणखी एक मोठा धक्का मानला जातो आहे.
एकीकडे उद्धव ठाकरे, शरद पवार (Sharad Pawar) आणि बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ लढाईची तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे त्यांना उर्वरित आमदारांना आपल्या सोबत ठेवण्यात अपयश येत असल्याचे दिसते आहे. या पार्श्वभूमीवर “उध्दव ठाकरे यांनी स्वतःच्या पक्षातील आमदारांचा विश्वास गमावला आहे, असं स्पष्ट दिसतंय. तांत्रिक मुद्दयांवर सरकार टिकू शकत असलं तरी नैतिकतेच्या मुद्दयांवर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे,” असे मत मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांनी व्यक्त केले आहे.
उध्दव ठाकरे यांनी स्वतःच्या पक्षातील आमदारांचा विश्वास गमावला आहे, असं स्पष्ट दिसतंय.तांत्रिक मुद्दयांवर सरकार टिकू शकत असलं तरी नैतिकतेच्या मुद्दयांवर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे.
— Ravindra Ambekar (@RavindraAmbekar) June 26, 2022