विश्वासघाताने आलेले शिंदे सरकार विधिमान्य नाहीये, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर केली आहे. विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला. यानंतर शिवसेना, काँग्रेससह घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी सरकावर जोरदार टीका केली. शिंदे गटातील एका आमदारे प्रक्षोभक भाषण केल्याची टीका करत अजित पवार यांनी आता कुठे सरकार आले आणि एवढी मस्ती आली का, असा सवाल विचारत सरकारला इशारा दिला आहे.