राज्यात दोन लोकांचं जे जम्बो कॅबिनेट आहे, त्यामध्ये खरा मुख्यमंत्री कोण आहे ते समजतच नाही, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे. ते मातोश्रीवर शिवसैनिकांशी बोलत होते. या राज्यातले राजकारण बदलायचं आहे, ही लढाई महाराष्ट्राची नाही तर देशातील कायद्याची लढाई आहे. जो काही कोर्टाचा निर्णय येणार आहे तो २०-३० वर्ष देशाला लागू होणार, असेही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना सांगितले.