India-US Trade करारात नेमकं कोण जबाबदार? जतीन देसाई यांचं विश्लेषण
भारत-अमेरिकेतील व्यापार करारावर वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची अर्णब गोस्वामी यांनी घेतलेली मुलाखत सध्या चर्चेत आहे. या चर्चेचा अर्थ नेमका काय ? यावर ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई यांचं विश्लेषण
India-US Trade Deal भारत-अमेरिकेतील व्यापार करारावर वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची अर्णब गोस्वामी यांनी घेतलेली मुलाखत सध्या चर्चेत आहे.रशियाकडून तेल खरेदी थांबवली का? करारात भारताचं नुकसान झालं का? असे थेट प्रश्न विचारले असता प्रत्येक वेळी एकच उत्तर मिळालं “परराष्ट्र मंत्रालयाला विचारा.” यातून असा प्रश्न उभा राहतो की सरकारमध्ये उजव्या हाताला डाव्या हाताचं कळत नाही का? पियुष गोयल हुशार आहेत, त्यांना माहिती नसणं शक्य नाही. पण अमेरिकेच्या बाजूने झुकलेला करार थेट मान्य करणं राजकीयदृष्ट्या अवघड असल्याने जबाबदारी ढकलण्याचा हा खेळ तर नाही ना? ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई यांनी या मुलाखतीमागचा अर्थ आणि सत्तेतील परस्पर टाळाटाळीवर परखड भाष्य केलं आहे.