"हिंदू खतरे में": प्रदूषण मारतंय, अर्थव्यवस्था लुटतंय, आणि दोषीही हिंदूच !
हिंदू कसे धोक्यात आहे? कुणापासून हिंदूंना धोका आहे? पुराव्यासहित सांगताहेत प्रा. नीरज हातेकर
Hindus in Danger हिंदू खतरे मे है. नक्की. त्यात काहीच शंका नाही.
पुरावा:
१. कामानिमित्त Pune पुण्यात राहायला लागते. ताथवडे. खिडकीतून बायपास रस्ता दिसतो. सतत वाहता रस्ता. भवताली अजस्त्र, विक्राळ इमारती. सकाळी फिरायला गेलो तर घसा, डोळे जळजळ सुरु. Air Pollution दुपारी जाऊन air purifier ऐअर प्युरीफायर आणला. सोबत फोटो टाकलाय. सगळ्या खिडक्या बंद असताना घरात पी एम २.५ चे प्रमाण ८० च्या आसपास आहे. खिडकी उघडली कि लगेच १०० वर जाते. पी. एम २.५ म्हणजे अगदी बारीक, श्वसन यंत्रणेत खोलवर रुतून बसणारे कण. परिणाम काय होतो शोधून पहा. इथल्या समस्त हिंदुची फुफुसे कामातून जाताहेत. bronchitis, हृदयविकार, stroke हे सगळे परिणाम समस्त हिंदुना भोगाय्ला लागतात. पण त्यातही गरीब, कष्टकरी हिंदुना तर बऱ्याच अधिक प्रमणात भोगायला लागतात. हवेतील प्रदूषणामुळे दर वर्षी अंदाजे २० लाख लोक मारतात त्यातील १६ लाख हिंदू असतात. हि परिस्थिती चुकीच्या विकास धोरणातून, एकूणच धोरण निर्मिती मुठभर लोकांनी ताब्यात घेतल्यामुळे होते आहे. हे ताब्यात घेणारे, चुकीची धोरणे जोमात राबविणारे सुद्धा बहुसंख्येने हिंदूच आहेत.
२. America अमेरिकेशी होऊ घातलेल्या डील च्या नुसत्या बातमीने soybeans सोयाबीन चे दर घसरले आहेत. सोयाबीन लावणारे शेतकरी बहुतेक हिंदू आहेत आणि डील चे निम्मित करून दर पाडणारे सुद्धा हिंदूच आहेत.
३. २०२० पासून white collar नोकरी करणाऱ्या मंडळींचे वेतन महागाई शी व्यस्त प्रमाणात वाढते आहे. नोकरी. कॉम ची आकडेवारी खिशाला चाट लावून विकत घ्या, नीट पहा आणि परिस्थिती लक्षात येईल. उत्पन्न वाढत नाहीये. शाळा, हॉस्पिटल चे खर्च मात्र वाढत आहेत. हि बहुसंख्य मंडळी हिंदूच आहेत. दुसरीकडे आकांक्षा वाढल्यात. कर्ज काढून खर्च होतोय. RBI मोठ्या प्रमाणात पैसा व्यवस्थेत ओतते आहे. त्याना अपेक्षित गुंतवणूक वाढत नाहीये, पण आकांक्षा आणि उत्पन्न ह्यांचा मेळ न लागणारे मध्यम वर्गीय निव्व्वल उपभोग खर्चा साठी म्हणून कर्जे घेताहेत. ह्याचा परिणाम म्हणून फायनान्स कंपन्या वाढत आहेत. हाती लागेल त्त्याच्या घशात पैसा उतरवत आहेत. पूर्ण पणे unsecured. मग परतफेड करण्याची क्षमता असो व नसो. बँक व्यवस्थेत unsecured कर्जांचे प्रमाण बरेच वाढले आहे. हि व्यवस्था जेंव्हा कोलमडेल तेंव्हा अडचणीत येणारे बहुसंख्य हिंदूच असतील.
४. कमी शिकलेल्या, फार काही ठोस स्किल मिळविण्याची संधीच न मिळालेल्या तरुण तरुणीची कामे म्हणजे गिग वर्क. कोणतीही शाश्वती नसलेले, जेमतेम जगण्या इतके उत्पन्न देणारी हे काम करणारे बहुसंख्य हिंदू आहेत. taxi च्या मागच्या काचेवर "हिंदू" म्हणून sticker सुद्धा लावतात. लहान गावात तर हे हि नाही. रिक्षा चालवणे, चहाची टपरी टाकणे वगैरे उद्योग करायचे. वाई- मुंबई अवैध प्रवासी वाहतूक जीव धोक्यात घालून भरधाव गाड्या चालवत रोज करायची. केवळ पोटाची खळगी भरायला रोज गुन्हा करायचा, पोलीस manage करायचे. हे हि बहुतेक हिंदूच.
५. एपस्टीन फाईल चा फार राजकीय परिणाम होत नाहीये. कारण इथे भरपूर एपस्टीन आहेत, देशज. indic.
असे किती सांगू?
हे सगळे हिंदूच आहेत. फक्त त्यातील महिला, शेत मजूर, असंघटीत कामगार, नोकरदार मध्यम वर्ग ह्यांची जास्त ठासून मारली जाते आहे.
अर्थात मुस्लीम, ख्रिस्ती वगैरे लोकांची परिस्थिती वेगळी नाहीये. हे सरकार खऱ्या अर्थाने "सर्व धर्म समभाव" मानणारे आहे. सर्व धर्म समभाव म्हणजे सगळ्या धर्माच्या लोकांना समान वागणूक. सगळ्यां धर्माच्या लोकांची सारखीच मारत आहेत. सगळ्या धर्मातील गरीब, महिला, असंघटीत कामगार, पांढरपेशा मध्यम वर्ग ह्यांची अधिक ठासून मारीत आहेत. हर्षवर्धन सपकाळ आणि शरद पोंक्षे , दोघेही काळाच्या प्रचंड मागे आहेत. दोघेही आपापल्या परीने जमेल तेवढे नुकसान करत आहेत. सपकाळ यांचे गुन्हे omission चे आहेत तर पोन्क्षांचे गुन्हे commission चे आहेत. एवढाच काय तो फरक.
(साभार - सदर पोस्ट नीरज हातेकर यांच्या फेसबुक भिंतीवरून घेतली आहे.)
Hindus in Danger, Air Pollution, Economic Inequality, Farmer's Distress, Gig Economy, Unsecured Loans, Middle Class Struggle