राज्यातील अनेक जिल्ह्यांना रविवारी अवकाळी पावसाचा फटका बसला. यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. सोलापूर, सांगली, नाशिक, यासह मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली. काही भागांत गारपीटही झाली.
या पावसामुळे गहू, हरभरा ज्वारीसह आंबा आणि इतर फळबागांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलंय. उघड्यावर असलेला कांदा भिजल्यानं शेतकऱ्यांना नुकसानाचा सामना करावा लागणार आहे. आज सकाळी पुन्हा लातूर, परभणीत पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यात तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.