करोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नवी मुंबईमधील एपीएमसीची पाचही मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे अन्नधान्य, भाजी, फळ, कांदा-बटाटा, मसाला मार्केट पूर्णपणे बंद राहणार आहे. सोमवारपासून एका आठवड्यासाठी म्हणजे ११ ते १७ मे पर्यंत मार्केट पूर्णपणे बंद राहणार आहे.
हे ही वाचा...
इकडे आड तिकडे विहीर…! मजूरांनी कुठं जावं?
Jitendra Awhad is Back: 'कोरोना'शी यशस्वी झुंज!
विधानपरिषद निवडणूक बिनविरोध नाहीच!
कॉंग्रेसकडून राजकिशोर मोदी यांना उमेदवारी जाहीर
कोकण आयुक्त, पोलीस आणि माथाडी नेते यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान या काळात APMC मधील व्यापारी, कामगारांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. या काळात संपूर्ण मार्केटमध्ये सॅनिटायझेशनचे काम हाती घेण्यात येणार आहे.