मराठवाडा पाणी हक्क परिषद राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत संपन्न

Update: 2021-09-16 13:05 GMT

औरंगाबाद शहरातील तापडिया नाट्यमंदिरात मराठवाडा बहुजन विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष रमेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा पाणी हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी आज दुपारी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याकार्यक्रमाला भाजपा आमदार अतुल सावे , आमदार बाबाजानी दुर्रानी माजी आमदार कल्याण काळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीना काकू शेळके त्याचबरोबर किशोर बलांडे, अविनाश गलांडे यांची उपस्थिती होती.

शहरातील समांतर पाणीयोजना फसवी असल्याचे रमेश गायकवाड यांनी आरोप केला तर त्याचबरोबर सिंचन प्रश्नाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सदरील पाणी हक्क परिषदेचे आयोजन केल्याची माहिती मराठवाडा बहुजन विकास आघाडीच्यावतीने देण्यात आली आहे.

मराठवाड्यातील सिंचन प्रश्नासंदर्भात विविध मुद्दे या पाणी हक्क परिषदमध्ये मांडण्यात आले.

दरम्यान मराठवाड्याच्या पाणी प्रश्न संदर्भात राज्य शासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचा मुद्दा मराठवाडा पाणी हक्क परिषदमध्ये मांडण्यात आला आहे.

Tags:    

Similar News