एखाद्या संवेदनशील प्रकरणात न्याय मिळण्याआधीच काही लोकांना व्हिडिओ व्हायरल करण्यातच जास्त रस असतो. राजकीय नेत्यांवर टीका करणारेच लोक जेव्हा बळी पडलेल्या महिलांचे व्हिडिओ पसरवतात, तेव्हा प्रश्न पडतोनेमकं यात त्यांना काय मिळतं?
या महिलांची चूक काय? त्या आधीच एका गंभीर प्रसंगातून जात आहेत. त्यातच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची उघडीपणे चिरफाड करून समाज म्हणून आपण त्यांना अजून किती शिक्षा देणार आहोत?
पोलिसांपर्यंत व्हिडिओ पोहोचण्याआधीच ते सोशल मीडियावर व्हायरल होतात, हे प्रशासनाच्या हलगर्जीपणाचं लक्षण आहेच; पण त्याहून मोठा प्रश्न म्हणजे आपली सामूहिक असंवेदनशीलता. पीडितांसोबतच त्यांच्या कुटुंबियांनाही या सगळ्याचा प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतो.
आपण थांबणार आहोत का? की अशाच प्रकारे एखाद्याच्या वेदनेतून मनोरंजन शोधत राहणार आहोत?
या विषयावर अधिक सखोल चर्चा करत आहेत मानसोपचारतज्ज्ञ हमीद दाभोलकर, आणि त्यांच्याशी संवाद साधला आहे संपादक प्रियदर्शिनी हिंगे यांनी...