अर्थसंकल्प शेतकरी, कामगार यांच्या हिताचा - महादेव जानकर

अर्थसंकल्पात सरंक्षण, आरोग्य, शिक्षण व शेतकरी या चार गोष्टींवर जास्त तरतूद करण्यात आल्या असून हा अर्थसंकल्प शेतकरी, कामगार यांच्या हिताचा असल्याचे मत आमदार महादेव जानकर यांनी व्यक्त केले आहे.

Update: 2021-02-01 08:46 GMT

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी देशाचे २०२१-२२ या वर्षासाठीचे बजेट सादर केले. हा अर्थसंकल्प शेतकरी, कामगार यांच्या हिताचा असून अर्थसंकल्पात सरंक्षण, आरोग्य, शिक्षण व शेतकरी या चार गोष्टींवर जास्त तरतूद करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रधानमंत्री हेल्थ केअर युनिट व दोन मोबाइल हॉस्पिटल चालू करण्याचा जो निर्णय घेतला आहे, ही खूप आनंदाची बाब असल्याचे मत आमदार महादेव जानकर यांनी व्यक्त केले आहे.

अर्थसंकल्पात सरंक्षण, आरोग्य, शिक्षण व शेतकरी या चार गोष्टींवर जास्त तरतूद करण्याचा प्रयत्न केला असून उपेक्षित लोकांसाठी घेतलेल्या निर्णयाबद्दल जानकर यांनी केंदीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार देखील मानले.

Full View


Tags:    

Similar News