लॉकडाऊनच्या काळात सरकारने दारू विक्रीला परवानगी दिली. पण सरकारच्या या निर्णयाला अनेकांनी विरोध केला आहे. महसूल वाढीसाठी हा निर्णय घेतल्याचे सरकार सांगत असले तरी सरकारचा हा युक्तीवाद कितपत योग्य आहे, दारुबंदीने अर्थव्यवस्थेला फायदा होऊ शकतो का, दारु सेवन करणारे वाढत असल्याने त्याचे सामाजिक परिणाम काय होतात, या सर्व प्रश्नांच्या उत्तरांसाठी मॅक्स महाराष्ट्रच्या कॉमन मॅन या सदरात सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांचा व्हिडिओ ब्लॉग नक्की बघा...