एक गाव पुरातलं...अंकलखोप

Update: 2019-08-15 13:53 GMT

दोन आठवड्यांपासून पडत असलेल्या मुसळधार पावासामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांमध्ये भयावह पूरस्थिती निर्माण झाली आहे. येथील जनजीवन विस्कळीत झाले असून शेकडो लोकांना सुरक्षितस्थळी हलवलं गेलं. या लोकांच्या पुनर्वसनाचे काम सुरू आहे. या जिल्ह्यांमध्ये अन्य ठिकाणी पूराच्या पाण्यात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ, लष्कराचे जवान आणि नौदलाची पथकं शर्तीचे प्रयत्न करतायत.

सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील असचं एक पुरातलं गाव अंकलखोप...या गावची परिस्थिती भयानक आहे. नागरिक पूरपरिस्थिती मुळे पूर्णपणे उध्वस्त झालेत. लोकांच्या घराजवळच मेलेली जनावरे, पक्षी यांच्या दुर्गंधी मुळे अनेक आजार पसरत आहेत. घरं मोडक्या अवस्थेत असून सरकारकडून लवकरात लवकर मदतीची अपेक्षा गावकऱ्यांना आहे.

Full View

Similar News