मुंबईसह राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागरीकांनी रक्तदान करावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केल आहे. हीच बाब लक्षात घेत पश्चिम उपनगरातील प्रबोधनी मीनाताई ठाकरे रक्तपेढी कोरोना रुग्णांसाठी आधारवड ठरत आहे. या ठिकाणी अनेक लोकांनी रक्तदान केलं आहे. या रक्तपेढीची स्थापना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली आहे.