कोविड-१९ व्हायरस जगभरात वेगाने पसरत आहे. भारतामध्ये महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सव्वा कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबईची पावसाळ्यात दरवर्षी होणारी तुंबई आणि त्यात वेगाने पसरणारा व्हायरस म्हणजेच जनतेचे आणखी हाल, साथीच्या आजारांना निमंत्रणच देण्यासारखे आहे.
करोना बरोबर पावसाळा उंबरठ्यावर असताना मुंबई सज्ज आहे का? येत्या काळात कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागणार आहे. या अडचणींचा सामना कसा करता येईल. एकंदरित करोनाच्या पार्श्वभूमीवर पावसाळ्यात रस्ते, नाले आणि अस्वच्छता याला मुंबई कशी सामोरे जाणार आहे. यावर मुंबई रक्षण समितीचे अॅड. गिरीश राऊत यांचं विश्लेषण नक्की पाहा...