कोराना व्हायरस ने जग लॉकडाऊन मध्ये अडकलेलं असताना गरिबांचं पोट देखील लॉकडाऊन झालं आहे. अशा परिस्थितीत सरकार स्वयंरोजगारी लोकांना, श्रमिकांना तुटपुंजी मदत का करत आहे? याची कारण काय? राज्यातील अनेक कामगार रस्त्यावरुन गावाकडं जात आहेत. त्यांच्या राहण्याची सोय अद्यापपर्यंत म्हणावी तशी सोय झालेली नाही. तरीही हा मुद्दा राजकारणाच्या केंद्रस्थानी का येत नाही? या प्रश्नावर कोणीही बोलत का नाही? राजकारण्यांना हा मुद्दा महत्वाचा का वाटत नाही.
कोरोना व्हायरसमुळं सरकारने सुरु केलेलं लॉकडाऊन आणि त्यामुळं निर्माण होणारी आर्थिक परिस्थिती आणि देशाचं राजकारण कोणत्या दिशेने जाईल. यावर आर्थिक घडामोडींचे विश्लेषक मिलिंद मुरुगकर यांनी ‘फ्रेंड्स ऑफ डेमॉक्रसी’ आयोजीत Lock Down Talks मध्ये ‘कॉवीड 19 चे आर्थिक संकट आणि समरसतेचे गारुड’ या सदरामध्ये मांडलेले विचार