बालदिनी लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संस्था, माध्यमं, अनाथ आश्रमांना भेट देतात. कॅंसर पिडीत बालकांशी बॉलिवुडचे सिताऱे भेट घेऊन काही उपक्रम राबवतात, मात्र आमच्या मॅक्स महाराष्ट्रच्या प्रतिनिधीनेे भेट घेतलीए ती पालावरच्या लहानग्यांची. आणि जाणून घ्यायचा प्रयत्न केलाय त्यांच्या बालपणाचा. त्यांच्या चेहऱ्यावरच्या निरागसतेचा, आई वडिलांना सोडून आश्रम शाळेत रहावं लागत असलेल्या आगतिकतेचा. त्यांचा शैक्षणिक, आर्थिक एकंदर सामाजिक उध्दार होणार कधी? सरकार विविध योजना जाहीर करतं. मात्र तरीही हा बालकं वंचित का आहेत...