एपीबी माझा या वृत्तवाहिनीच्या टीआरपीमध्ये गेल्या २ आठवड्यांमध्ये घसरण झाली आहे. हा आमचा दावा नाही. तर ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिल इंडिया म्हणजे बार्क या संस्थेच्या ताज्या आकड्यांमधून हे सिद्ध झालं आहे.
सरलेल्या २ आठवड्यांमध्ये एबीपी माझाला त्यांचा पहिला क्रमांक टिकवता आलेला नाही. बार्कच्या गेल्या 2 आठवड्यांमधील आकड्यांवर नजर टाकली तर ते सहज लक्षात येईल
महत्त्वाचं म्हणजे गेल्या आठवड्यात एबीपीच्या ग्रामीण भागातील टीआरपीमध्ये सुद्धा घसरण झाली आहे. याचा अर्थ ग्रामीण भागात लोकांनी या चॅनेलकडे पाठ फिरवलीय असा होतो.