वाजपेयींच्या मृत्यूचं भाजप आणि मोदींकडून राजकारण होत आहे

Update: 2018-08-24 06:25 GMT

माजी पंतप्रधान वाजपेयीजींच्या निधनाला एक आठवडा झाला असताना एक नवीन वाद निर्माण झाला आहे. वाजपेयीजींच्या निधनाचं राजकारण करून नरेंद्र मोदी आणि भाजप २०१९ च्या निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठी करत आहेत, असा आरोप करुणा शुक्ला यांनी केला आहे.

‘अटलबिहारी वाजपेयी यांच्या मृत्यूचं राजकारण करताना भाजपाला थोडीही शरम वाटत नाही’, असे संतप्त विधान त्यांनी केले आहे. वाजपेयीजींच्या नावाचा वापर राजकारणासाठी करू नये तसंच त्यांच्या आदर्शांवर चालले तर देशाचं भलं होईल असाही टोला त्यांनी लगावलेला आहे.

Similar News