कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे आणि यातही असंघटित क्षेत्रातील कामगारांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. सरकारनं अनेक उपाययोजना केल्या असल्या तरी त्यात त्रुटी असल्याचं कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीचं म्हणणं आहे. या त्रुटी दूर करण्यासाठी संयुक्त कृती समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून सुधारणेचे काही प्रस्ताव दिले आहेत. याबद्दल माहिती दिली आहे संयुक्त कृती समितीचे समन्वयक विश्वास उटगी यांनी