Ground Report : भूस्खलनामुळे घर गमावलेल्या कुटुंबाचा संघर्ष, सरकारी मदत नाहीच

Update: 2021-08-04 10:11 GMT

सातारा जिल्ह्यातील काही भागात गेल्या १५ दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे डोंगराळ भागात भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये अनेक ठिकाणी घरांना धोका असल्याने अशा भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे. पाटण तालुक्यातील अशाच काही गावातील लोकांना कोयनानगर इथल्या एका शाळेत स्थलांतरीत कऱण्यात आले आहे. घर धोकादायक होते आणि आता ते पडले असेल. त्यामुळे आम्हाला स्थलांतरीत केले, पण सरकारी मदत मिळालेली नाही. घरातील कर्ता पुरूष आजारी पडला आहे, हातचं घर गेले आहे, त्यामुळे सरकारने आम्हाला हक्काचा निवारा द्यावा अशी मागणी यी पीडित कुटुंबाने केली आहे. 

Similar News