भारताने अंधांचा क्रिकेट विश्वचषक जिंकला, पाकिस्तानला हरवले

Update: 2018-01-20 13:39 GMT

अंध भारतीय क्रिकेट संघ विश्वविजेता ठरला आहे. पाकिस्तानचा पराभव करुन भारताने हा किताब मिळवला आहे.अंधांच्या पाचव्या वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताने पाकिस्तानला 2 गडी राखून पराभूत केले आहे. यासोबत भारताने हे वर्ल्ड कप सलग दुसऱ्यांदा आपल्या नावे केले. या सामन्यात भारताने टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या पाकिस्तानने 8 गडी गमवून 308 धावा काढल्या होत्या. पाकिस्तानने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने 2 गडी राखून जगज्जेतेचा मान कायम ठेवला. सेमीफायनलमध्ये भारताने बांग्लादेशला 7 गडी राखून पराभूत करत फायनलमध्ये मजल मारली होती. तर पाकिस्तानने श्रीलंकेला 156 धावांनी पराभूत करत फायनलमध्ये आपली जागा निश्चित केली होती.

Similar News