सध्या २०१९ च्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. प्रत्येकजण आपआपल्या पक्षाचा प्रचार करू लागले आहे. दरम्यान येत्या २०१९च्या लोकसभा निवडणुकीआधी भाजपला अजून एक धक्का लागण्याची दाट शक्यता आहे. कारण बिहार मध्ये आरएलएसपी आणि भाजपमध्ये जागावाटपावरुन वाद सरू आहे, यातच उपेंद्र कुशवाहा यांनी पटनामध्ये म्हटलं की, भाजप अध्यक्ष यांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी मला वेळ नाही दिला.