केंद्र सरकारने लोकपाल शोध समितीची घोषणा केली मात्र जोपर्यंत लोकपालाची नेमणूक होत नाही तोपर्यंत जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आपल्या उपोषणावर ठाम असल्याचे सांगितले. तसेच या सरकारने बराच वेळ लावला.या सरकारकडे इच्छाशक्तीचा अभाव दिसून आल्याचं अण्णांनी म्हटलंय. सर्वांना या कायद्याची भीती आहे म्हणून आज पर्यँत याची नेमणूक करण्यात आली नाही, मागच्या सरकारने 2011 ला कायदा लागू केला पन या सरकारने त्याची अद्याप अंमल बजावणी केली नाही.त्यामुळे दोन ऑक्टोबरच्या आंदोलना वरती अण्णा हजारे ठाम आहेत.