गोखलेंचा विक्रम!

Update: 2021-11-15 11:48 GMT

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव की हीरकमहोत्सव? यावरून उद्धव ठाकरेंना लक्ष करणारे लोक, कंगना रणौत आणि विक्रम गोखलेंबाबत गप्प का आहेत? कंगना रणौत आणि विक्रम गोखले यांच्या वक्तव्याने देशात नवा वाद निर्माण झाला आहे. अभिनेत्री कंगना रणौतला नुकताच पद्मश्री पुरस्कार मिळाला. त्यानंतर यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असताना तिचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ती या व्हिडीओमध्ये टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत म्हणते.. आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले ते भीक होती, देशाला खरं स्वातंत्र्य 2014 मध्येच मिळालं, असं वादग्रस्त वक्तव्य तिने केले होते. तिच्या या वक्तव्याला आता अभिनेते विक्रम गोखले यांनी देखील समर्थन दिलं आहे. मात्र, देशाभिमान, स्वातंत्र्य, राष्ट्रभक्तीचे देशाला डोस पाजणारे गप्प का आहेत.  पाहा ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचं रोखठोक विश्लेषण...

Full View

Tags:    

Similar News