T20 World Cup नंतर देणार कर्णधारपदाचा राजीनामा, विराट कोहलीची घोषणा

Update: 2021-09-16 13:38 GMT

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने टी२० प्रकारातील भारतीय संघाचं कर्णधार पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील महिन्यात दुबईत होणाऱ्या T20 World Cup 2021 नंतर भारतीय संघाच्या कर्णधार पदावरून पायउतार होणार आहे. विराट ने ट्विटरवर याबाबत माहिती दिली. या वेळी त्याने भारतीय संघाचे प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ, संघातील खेळाडु आणि चाहते यांचे आभार मानले आहेत. सततच्या येणाऱ्या कामाच्या ताणामुळे हा निर्णय घेतल्याचे विराट ने म्हटलं आहे. विराट नेमकं काय म्हणाला आहे पाहुयात.

यानंतर भारतीय संघाचं टी२० प्रकारातील नेतृत्व रोहित शर्मा कडे सोपवलं जाण्याची दाट शक्यता आहे.

Full View

Tags:    

Similar News