साहित्य अकादमी पुरस्कार नाकारणारे टोकदार लेखक नंदा खरे यांचे निधन

2020 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार नाकारणारे लेखक, कादंबरीकार अशी ओळख असलेले नंदा खरे यांचे दीर्घ आजाराने वयाच्या 76 व्या वर्षी पुणे येथे निधन झाले.

Update: 2022-07-23 01:50 GMT

ज्येष्ठ लेखक नंदा खरे यांना 2020 मध्ये उद्या नावाच्या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला होता. मात्र नंदा खरे यांनी साहित्य अकादमी पुरस्कार नाकारला होता. त्यावेळी समाजाने मला खूप काही दिलं, त्यामुळे मी हा पुरस्कार नाकारत असल्याचे म्हटले होते.

नंदा खरे यांचा जन्म 1946 मध्ये नागपूर येथे झाला होता. तर त्यांचे नाव अनंत यशवंत खरे असे होते. मात्र नंदा खरे म्हणूनच त्यांनी लेखन केले. नंदा खरे यांनी मुंबई आयआयटीमधून पदवी घेतली. त्यानंतर काही काळ नंदा खरे यांनी अभियंता म्हणून काम केले. मात्र त्यानंतर त्यांनी लेखनाकडे वळण्याचा निर्णय घेतला.

नंदा खरे यांचे अत्यंत टोकदार लेखन करणारे लेखक अशी ओळख होती. तसेच त्यांनी मराठी साहित्यामध्ये मोलाची भर घातली. नंदा खरे हे विज्ञानवादी आणि विवेकवादी दृष्टीने लेखन करणारे लेखक होते. तर त्यांनी लिहीलेली अंताजीची बखर, उद्या, बखर अंतकाळाची या कादंबऱ्या लोकप्रिय झाल्या.

नंदा खरे यांना उद्या कादंबरीसाठी 2020 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला होता. मात्र त्यांनी सन्मानपुर्वक कारण देऊन साहित्य अकादमी पुरस्कार नाकारला.

नंदा खरे हे ठाम वैचारिक भूमिका असलेले लेखक होते. त्यामुळे लिखाणात त्यांनी कोणत्याही प्रकारची तडजोड केली नसल्याचे दिसून येते. तसेच त्यांनी वृत्तपत्रातही लेखन केले. तर त्यांनी लिहीलेला कहाणी मानवप्राण्याची हा ग्रंथ वैचारिक लेखणातील महत्वाचा ग्रंथ मानला जातो.

नंदा खरे यांनी लिहीलेल्या कापूसकोंड्याची गोष्ट या साहित्यकृतीवर चित्रपट बनवण्यात आला. तसेच त्यांच्या उद्या, नांगरल्याविण भुई, दगड धोंडे, वाचताना पाहताना जगताना, बखर अंतकाळाची, वारूळ पुराण, अंताजीची बखर, बाजार, इंडिका, संपत्ती, दगडावर दगड, विटेवर वीट, ऐवजी, संपत्ती, ऑन द बिच या साहित्यकृती प्रसिध्द आहेत.

सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करून व्यक्त केले दुःख

ज्येष्ठ लेखक व कादंबरीकार अनंत खरे यांचे निधन झाले.ते नंदा खरे या नावाने ओळखले जात. 'अंताजीची बखर', 'बखर अंतकाळाची' आणि 'उद्या' या त्यांच्या उल्लेखनीय साहित्यकृती आहेत.त्यांच्या 'उद्या' या कादंबरीला २०२० चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता.



 माजी मंत्री उदय सामंत यांनी ट्वीट करून नंदा खरे यांना श्रध्दांजली वाहिली आहे.

ज्येष्ठ साहित्यिक अनंत यशवंत ऊर्फ नंदा खरे यांच्या निधनाची बातमी समजली. 'अंताजीची बखर', 'बखर अंतकाळाची' आणि 'उद्या' या त्यांच्या उल्लेखनीय कादबंऱ्या आहेत. त्यांच्या जाण्याने मराठी साहित्य क्षेत्राची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. भावपूर्ण श्रद्धांजली!



Tags:    

Similar News