दुर्दैवाने देशाची जीडीपी वाढली का कमी झाली? याच्या चर्चा फक्त अर्थतज्ञ, सेमिनार हॉल्स, इंग्रजी मीडिया, स्टॉक मार्केट्स मध्ये होतात. ज्या दिवशी जीडीपीच्या चर्चा गावातील पारावर, देवळांमध्ये, मशिदींमध्ये, चहाच्या टपरीवर, तरुणांच्या अड्ड्यावर, मुंबईतील लोकल ट्रेन्समध्ये, चाळीतील बायांच्या गप्पांमध्ये सुरु होतील. त्यावेळी कधीही वितळू न शकणारे बर्फ वितळू लागले आहे असे समजावे.
कोण्या डाव्या विचांरांच्या अर्थतज्ञांचे नाही गुरुशरण दास, प्रॉक्टर अँड गॅम्बल यांचे विश्लेषण ऐका !
जीडीपी मंदावल्यामुळे कोट्यवधी कुटुंबाना झळ बसू शकते ! गुरुशरण दास भारतीय कॉर्पोरेट क्षेत्रातील एक मोठे नाव आहे आणि कडवे “अँटी लेफ्ट” म्हणून ओळखले जातात. भारतीय अर्थव्यवस्था किमान गेली पाच तिमाही सातत्याने मंदावत आहे; तिचा वाढ दर बघा
२०१८ च्या पहिल्या तिमाहीत : ८%
२०१८ च्या दुसऱ्या तिमाहीत : ७%
२०१८ च्या तिसऱ्या तिमाहीत : ६.६ %
२०१८ च्या चौथ्या तिमाहीत : ५.८%
२०१९ च्या पहिल्या तिमाहीत : ५%
म्हणजे गेल्या १५ महिन्यात जीडीपी ३ टक्क्यांनी मंदावली