अयोध्येतील रामजन्म भूमितील वादग्रस्त जागा रामलल्लाची असल्याचा ऐतिहासीक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज दिला आहे. या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचे घटनापीठाच्या अध्यक्षतेखाली झाली. या घटनापीठात न्यायमुर्ती शरद अरविंद बोबडे, न्यायमुर्ती अशोक भूषण, न्यायमुर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमुर्ती एस. अब्दुल नजीर यांचा या खंडपीठात समावेश आहे.
मात्र, या निर्णयाचा नक्की अर्थ काय? शिया समुदायाची याचिका न्यायालयाने का फेटाळली. निर्मोही आखाडा बाबत सर्वोच्च न्यायालयानं काय म्हटलं? श्रद्धा, धर्म, आस्था याचा निकालावर परिणाम झाला का? पाहा घटनेचे जानकार ज्येष्ठ वकील असिम सरोदे यांचं विश्लेषण