तौक्ते चक्री वादळ धडकले रायगड समुद्र किनारी.....

Update: 2021-05-17 05:38 GMT

भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजा नुसार तैक्ते चक्रीवादळ गोवा सिधुदुर्ग या समुद्र किनारी याचा प्रभाव जाणवला तर आज रायगड समुद्र किनारी तैक्ते वादळाचा प्रभाव जाणवला अजस्त्र लाटां उसळल्या होत्या वार्याचा वेग ही प्रचंड होता. या वादळा साठी रायगड जिल्हा प्रशासन सज्ज झाले होते साधारण जिल्ह्यातील ८००० नागरीकांचे स्थलांतर करण्यात आले तर ९३ बोटी खोल समुद्रात माशे मारी साठी गेलेल्या समुद्र किनारी परतल्या असुन खाडी किनारी असलेल्या ६२ गावे तर समुद्र किनारी असलेल्या १२८ गावांना सतर्कतेचा ईशारा देखील देण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्वच लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली असुन संचारबंदी देखील करण्यात आली आहे. फक्त मेडीकल अथवा दवाखाने येथे जाण्यासाठी परवांगी देण्यात आली आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतीनीधी धम्मशील सावंत यांनी


Full View

Tags:    

Similar News