देशात नुकत्याच लोकसभेच्या निवडणूका पार पडल्या. या निवडणुकांच्या निकालासंदर्भातील अनिश्चिततेमुळं जानेवारी ते मार्च २०१९ या तिमाहीत देशाचा विकास दर कमी झाल्याचं आज संसदेत सादर झालेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात नमूद करण्यात आलंय. जानेवारी ते मार्च २०१९ या तिमाहीत देशाचा विकास दर केवळ ५.८ टक्के इतका होता. शिवाय २०१८ मध्ये विकास दर ६.८ टक्के कमी झाल्यानं एनबीएफसी संकटात असल्याची भीतीही अहवालात वर्तवण्यात आली आहे.