प्रताप सरनाईक यांच्या पत्रावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया

Update: 2021-06-21 06:53 GMT

भाजपशी जुळवून घ्या या प्रताप सरनाईक यांच्या पत्राबद्दल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. ते त्रासात आहेत , अडचणीत आहेत आणि त्यांच्या अडचणींचे कारण त्यांनी त्यांच्या पत्रात स्पष्ट म्हटले आहे.

भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून विनाकारण त्रास देत आहे, असं या पत्रामध्ये स्पष्ट म्हटलं आहे, त्यामुळे

या त्रासातून सुटका म्हणून आपण मोदींशी जुळून घ्यावे असं त्यांचं म्हणणे असल्याचे राऊत यांनी सांगितले आहे.

पण पत्रातील ती भूमिका हे त्यांचे मत आहे. मात्र पक्षाची भूमिका हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सगळ्यांशी चर्चा करून ठरवताल आणि तेच निर्णय घेण्यारे आहेत असेही राऊत यांनी स्पष्ट केले आहे. या संकटाची कसा सामना करायचा त्यासाठी सरनाईक यांच्या पाठीशी संपूर्ण शिवसेना पक्ष आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव आहे असं मला तरी वाटत नाही. महाविकास आघाडी मध्ये कोणत्याही प्रकारचा संभ्रम नाही. विनाकारण त्रास का होतो याची कारणं सरनाईक यांनी पत्रात दिली आहे. त्याचा अभ्यास मिडीयाने आणि महाविकास आघाडीतील पक्षांनी करायला हवा, असेही त्यांनी म्हटले आहे.

Full View

Tags:    

Similar News