#गावगाड्याचे इलेक्शन : पैठणमध्ये ७८ पैकी ७५ ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा झेंडा

Update: 2021-01-18 09:39 GMT

औरंगाबाद: ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आता वेगाने समोर येऊ लागले आहेत. नाथांची नगरी समजल्या जाणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात शिवसेनेचा भगवा फडकला आहे. शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेटमंत्री संदीपान भुमरे यांनी आपलं वर्चस्व कायम ठेवले आहे. पैठणमध्ये एकूण 80 ग्रामपंचायतसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यापैकी 2 ठिकाणी बिनविरोध निवड झाली होती. तर उरलेल्या ७८ पैकी ७५ जागांवर शिवसेनेने विजय मिळवला असल्याचा दावा भुमरे यांनी केला आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेला हरवण्यासाठी विरोधकांनी मोठा प्रयत्न केला मात्र मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. त्यामुळे त्यांनी आता राजकारण सोडून घरात बसावं असा टोला संदीपान भुमरे यांनी लगावला आहे.

Tags:    

Similar News