राणेंना आता झोप चांगली लागेल: शरद पवारांचा टोला

Update: 2021-01-22 07:45 GMT

ज्य सरकारने राज्यातील काही नेत्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांचाही समावेश आहे. राणे यांची शासनाने सुरक्षा काढली असली तरी त्यांना केंद्राने सुरक्षा पुरवली आहे. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता नारायण राणेंना सुखानं झोप लागेल. असं म्हणत टोला लगावला आहे. ते कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलत होते,

'कायदा-सुव्यवस्था याचा नेमकाविचार करून कोणाला किती सुरक्षा पुरवायची याचा निर्णय राज्य शासन घेत असते. त्यानुसार राज्य शासनाने निर्णय घेतला असताना केंद्र शासनाने त्यामध्ये हस्तक्षेप करून पुन्हा नव्याने सुरक्षा पुरवली आहे; ही पद्धत योग्य नाही, माझीही सुरक्षा व्यवस्था कमी केली होती पण त्यावर आपण काहीही प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती.' असं म्हणत 'ज्यांना पुरवली त्यांनी मागणी केली असेल. निदान झोप तरी चांगली येईल. चांगली गोष्ट आहे. काही लोकांना आनंद असतो. ते सगळं बरोबर घेऊन जायला.'

असा टोला पवारांनी लगावला आहे. शरद पवार आज कोल्हापुरात असून त्यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले. त्या अगोदर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Tags:    

Similar News