डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 370 कलमाचा विरोध केला होता – तृप्ती देसाई

Update: 2019-08-06 12:49 GMT

भाजपने आपल्या जाहीरनाम्यामध्ये सांगितल्याप्रमाणे 370 कलम व 35 अ कलम रद्द करण्याचा प्रस्ताव गृहमंत्री अमित शाह यांनी मांडला आणि तो 125 विरुद्ध 61 मतांनी पारित झाला आहे. ही खूप आनंदाची बाब आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही या कलमाचा विरोध केला होता. असं मत सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी व्यक्त केलं आहे.

कलम 370 रद्द करण्याचा प्रयत्न यापूर्वीही जेव्हा करण्यात आला तेव्हा - तेव्हा प्रक्रियेमध्ये धर्म आड आणण्याचा प्रयत्न केला जातं होता. कलम 370 असो किंवा ट्रिपल तलाक कायदा असो. यांना धर्मासोबत जोडलं जात. 72 वर्षांच्या संघर्षातून हे कलम रद्द करण्याचा प्रस्ताव सभागृहात मांडण्यात आला. 370 कलमामुळे आता काश्मीरमध्येही भारतीय तिरंगा फडकेल. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत एक भारत आता खरंच अस्तित्वात येईल.

https://www.facebook.com/MaxWoman.net/videos/2434920706829450/?t=11

 

Similar News