अहमदनगर ऐवजी "पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर"; राज्यमंत्रीमंडळाने दिली मंजूरी
राज्यात छत्रपती संभाजी नगर, धाराशीव या शहरांच्या नामकरणानंतर, राज्य मंत्रीमंडळाच्या मंजूरीने आता अहमदनगर शहराचे देखील नाव बदलून "पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर" असं नाव देण्यात आलं आहे. मलिक अहमद निजाम शहाच्या नावावरून हे नाव पडलेलं होतं, शिवसेनेनं या शहराचं नाव अंबिका नगर असं ठेवण्यात यावं ही मागणी केलेली होती.
दरम्यान, भाजपचे आमदार गोपीचंद पडळर यांनी महाविकास आघाडीच्या काळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या शहराच्या नामांतराची मागणी केली होती. अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं जन्मस्थळ असलेलं गाव आहे. अहमदनगर शहराला राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव देण्याची मागणी होती. राज्य मंत्रीमंडळाकडून या मागणीला मंजूरी मिळाल्यानंतर अहमदनगर शहराला आता "पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर" असं नाव देण्यात आलं आहे.