भर पुरात स्टंटबाजी नको, जीवावर बेतू शकते !

Update: 2022-07-12 06:11 GMT

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी भागात जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. नांदूरमधमेश्वर धरणातून 50 हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पण गोदावरी नदीतून सोडण्यात आलेले पाणी पुलावरुन जात असतानाही नागरिक पुलावर उभे राहून जीव धोक्यात घालत असल्याचे दिसते आहे. अनेक लोक सेल्फी काढत स्टंटबाजी करत आहेत. अशाप्रकारे स्टंटबाजी जीवावर बेतू शकते.

Similar News